Sunday, August 10, 2014

"आश्वासक".....

भारतीय जनता पार्टी,सिंधुदुर्गचा सुमारे पंधरा वर्षाचा प्रवास,त्यातले चढउतार जवळून पाहाताना गेल्या सोमवारचा दिवस फार आनंददायी असा भासला.त्यादिवशीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्ह्यातल्या सुमारे पाचपन्नास सक्रीय कार्यकर्त्यांचा पक्षात झालेला प्रवेशसोहळा पदाधिकारी आणि जुनेजाणते कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवणारा असा होता.मोदी साहेबांच्या रूपाने भारताला एक न भूतो न भविष्याती असा पंतप्रधान मिळाल्यावर देशातील तमाम नागरिकांमध्ये एक चैत्तन्य पसरले असून त्यांच्या इतकी वर्षे दबलेल्या आणि मेलेल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.आणि एक कार्यकर्ता म्हणून नक्की हा विश्वास आहे की देश,राज्य आणि जिल्हा पातळीवरील सर्व भाजप कार्यकर्ते आता राजकारणापलीकडे जाऊन शाश्वत असे काम उभे करतील.
याचाच एक भाग म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी कालच्या बैठकीत विविध विषयातल्या तज्ञांना खास मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते.त्यात जिल्ह्यात ग्रामविकासाचे चांगले काम उभे करणारे डॉ.प्रसाद देवधर,कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव,मच्छिमार कृती समितीचे विकी तोरस्कर,सोशल मिडिया मार्गदर्शक खानोलकर या मंडळीनी कार्यकर्त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सध्याच्या भाजप टीममधील बरेचसे पदाधिकारी हे युवामोर्चाच्या "अतुल टीम" मधील असून पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आणि आमदार प्रमोद जठार,माजी आमदार अजितराव गोगटे आणि इतर जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कार्यरत आहेत.आशा करू की यापुढे असेच पक्षप्रवेश घडत राहतील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील संघटन हे जिल्ह्यातल्या इतर पक्षांना केवळ संख्यात्मक दुष्ट्या नव्हे तर गुणात्मक दुष्ट्या सुद्धा "ओव्हरटेक"करून पुढे जाईल......

No comments:

Post a Comment