"बाबल्याचो सत्कार".....
दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीला "तंटामुक्ती"चा विशेष पुरस्कार मिळाला.पुरस्काराच्या तीन लाख रकमेच्या विनियोगावरून गावातल्या सत्ताधारी आणि विरोधी अश्या दोन पक्षात इतके "तंटे" उदभवले होते की त्यांचे निवारण झाल्यावर खरंतर सरकारने गावला आणखी एक पुरस्कार द्यायला हवा होता.कोणतेही इतर विकासकाम न करता सदरच्या निधीतून फक्त विविध "सत्कार समारंभ" करण्याच्या अटीवर आमच्या एका ग्रामसभेने "तंटामुक्ती समितीला" निधी खर्चाची परवानगी दिली होती,परिणामी तेव्हापासून गावात "सत्कार सोहळे"सुरु झाले.त्यामुळे आतापर्यंत या ना त्या निमित्ताने गावातील सुमारे नव्वद टक्के नागरिक "शाल श्रीफळ"योजनेचे लाभार्थी झाले आहेत.आता सत्कारापासून वंचित असलेली दहा टक्के जनता लवकरात लवकर "सत्कारमूर्ती"व्हावीत व या झंझटीतून आपली लवकर मोकळीक व्हावी यासाठी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रयत्नशील आहेत आणि सत्कारासाठी वेगवेगळे फंडे शोधत आहेत.
या "सत्कारवंचित" यादीत आज सकाळपर्यंत आमचा "बाबल्या"सुद्धा होता.अनेकांचे विनाकारण झालेले सत्कार बाबल्याने याच देही याच डोळी न चुकता अनुभवलेले होते.सर्वांसमक्ष आपल्याही गळ्यात पंचायतीची शाल पडावी अशी त्याचीही इच्छा होती.आणि तंटामुक्ती अध्यक्षांच्या कल्पकतेने आज ती फलद्रूप झाली.
आज तेरा ऑगस्ट "जागतिक डावखुरा दिन" ....या दिवसाचे औचित्त साधून ग्रामपंचायतीने गावातील सर्व डावखुऱ्या मंडळींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.बारा जणांच्या सत्कारमूर्ती यादीत "बाबल्या"चे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
बाबल्या तसा "कट्टर डावखुरा" होता,कारण जेवण्यापासून सगळीच कामे तो डाव्या हातानेच करायचा.आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या घरी ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्याने "सन्मानाचे निमंत्रण"घेऊन स्वतः ग्रामसेवक भाऊ गेले होते.त्यामुळे तो भलताच खूष होता.बऱ्याचदा चेष्टेचा ठरणारा डावा हात इतकी मोठी संधी देईल याची त्याला खरंतर कल्पनाच नव्हती.
बारा सत्कारमूर्तीमधून सातजणचं उपस्थित होते.बाकीचे बहुदा "उभयकर"असल्याने त्यांनी सत्काराकडे पाठ फिरवली असावी असे समजून नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सुरु झाला.नेहमीपेक्षा आजची कार्यक्रमाची उपस्थिती फारच चांगली होती,कारण यापाठी बाबल्याची मोठी मेहनत होती,त्यामुळे डावखुऱ्या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून त्याला व्यासपीठावर स्थान मिळाले.डाव्या हाताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचे दिपप्रज्वलन सर्वांनी डाव्या हातानेच केले.कार्यक्रम सुरु झाला.सर्वप्रथम सर्व डावखुऱ्या व्यक्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि फोटोसेशन झाले मग एकेक करून वक्ते माईकचा ताबा घेऊ लागले.
ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्रीय असतो अशी माणसे डावखुरी असतात असे कोणीतरी म्हणताच बाबल्याने डोक्याच्या उजव्या बाजूवरुन अभिमानाने हात फिरवला.कुणीतरी डावखुऱ्या व्यक्तीविषयीचे समज गैरसमज यावर तत्वज्ञान पाजळले.तर कुणीतरी त्याची जागतिक आकडेवारी जाहीर केली.जगात दहा टक्के लोक डावखुरे आहेत हे ऐकून बाबल्याबरोबरच इतरांनाही आपण "अल्पसंख्यांक"नसल्याचा साक्षात्कार झाला.सरते शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंचानी जगातल्या अनेक प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची नावे सांगितली,पैकी अमेरिकेचे बराक ओबामा,आपला अमिताभ आणि सौरभ गांगुली यांची नावे सोडून इतर नावे कोणालाच समजली नाहीत कारण अध्यक्षांकडून त्या अवघड इग्लिश नावांचे उच्चार आणि नावे-आडनावे एकमेकात बेमालूमपणे मिक्स झाली होती.फक्त अमेरिकेचे बरेच अध्यक्ष हे डावखुरे होते हे समजल्यावर आपण इंडियात जन्मलो ही (आईबाबांची) मोठी चूक झाल्याचे बाबल्याने अनेकांजवळ बोलून दाखवले.आभाराच्या भाषणाने कार्यक्रम संपला.डाव्या हाताने प्लेट मधला चिवडा खाताखाता बाबल्याने हळूच अध्यक्षांना विचारले,
"अध्यक्षानु...आता "पायाळू"लोकांचो सत्कार कधी?....नाय ..माझे दोनव झील "पायाळू"आसत म्हणान इचारलयं"..
आणि तंटामुक्ती अध्यक्षांना सत्कारासाठीचा "नवीन" विषय मिळाला.....
दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीला "तंटामुक्ती"चा विशेष पुरस्कार मिळाला.पुरस्काराच्या तीन लाख रकमेच्या विनियोगावरून गावातल्या सत्ताधारी आणि विरोधी अश्या दोन पक्षात इतके "तंटे" उदभवले होते की त्यांचे निवारण झाल्यावर खरंतर सरकारने गावला आणखी एक पुरस्कार द्यायला हवा होता.कोणतेही इतर विकासकाम न करता सदरच्या निधीतून फक्त विविध "सत्कार समारंभ" करण्याच्या अटीवर आमच्या एका ग्रामसभेने "तंटामुक्ती समितीला" निधी खर्चाची परवानगी दिली होती,परिणामी तेव्हापासून गावात "सत्कार सोहळे"सुरु झाले.त्यामुळे आतापर्यंत या ना त्या निमित्ताने गावातील सुमारे नव्वद टक्के नागरिक "शाल श्रीफळ"योजनेचे लाभार्थी झाले आहेत.आता सत्कारापासून वंचित असलेली दहा टक्के जनता लवकरात लवकर "सत्कारमूर्ती"व्हावीत व या झंझटीतून आपली लवकर मोकळीक व्हावी यासाठी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रयत्नशील आहेत आणि सत्कारासाठी वेगवेगळे फंडे शोधत आहेत.
या "सत्कारवंचित" यादीत आज सकाळपर्यंत आमचा "बाबल्या"सुद्धा होता.अनेकांचे विनाकारण झालेले सत्कार बाबल्याने याच देही याच डोळी न चुकता अनुभवलेले होते.सर्वांसमक्ष आपल्याही गळ्यात पंचायतीची शाल पडावी अशी त्याचीही इच्छा होती.आणि तंटामुक्ती अध्यक्षांच्या कल्पकतेने आज ती फलद्रूप झाली.
आज तेरा ऑगस्ट "जागतिक डावखुरा दिन" ....या दिवसाचे औचित्त साधून ग्रामपंचायतीने गावातील सर्व डावखुऱ्या मंडळींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.बारा जणांच्या सत्कारमूर्ती यादीत "बाबल्या"चे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
बाबल्या तसा "कट्टर डावखुरा" होता,कारण जेवण्यापासून सगळीच कामे तो डाव्या हातानेच करायचा.आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या घरी ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्याने "सन्मानाचे निमंत्रण"घेऊन स्वतः ग्रामसेवक भाऊ गेले होते.त्यामुळे तो भलताच खूष होता.बऱ्याचदा चेष्टेचा ठरणारा डावा हात इतकी मोठी संधी देईल याची त्याला खरंतर कल्पनाच नव्हती.
बारा सत्कारमूर्तीमधून सातजणचं उपस्थित होते.बाकीचे बहुदा "उभयकर"असल्याने त्यांनी सत्काराकडे पाठ फिरवली असावी असे समजून नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सुरु झाला.नेहमीपेक्षा आजची कार्यक्रमाची उपस्थिती फारच चांगली होती,कारण यापाठी बाबल्याची मोठी मेहनत होती,त्यामुळे डावखुऱ्या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून त्याला व्यासपीठावर स्थान मिळाले.डाव्या हाताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचे दिपप्रज्वलन सर्वांनी डाव्या हातानेच केले.कार्यक्रम सुरु झाला.सर्वप्रथम सर्व डावखुऱ्या व्यक्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि फोटोसेशन झाले मग एकेक करून वक्ते माईकचा ताबा घेऊ लागले.
ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्रीय असतो अशी माणसे डावखुरी असतात असे कोणीतरी म्हणताच बाबल्याने डोक्याच्या उजव्या बाजूवरुन अभिमानाने हात फिरवला.कुणीतरी डावखुऱ्या व्यक्तीविषयीचे समज गैरसमज यावर तत्वज्ञान पाजळले.तर कुणीतरी त्याची जागतिक आकडेवारी जाहीर केली.जगात दहा टक्के लोक डावखुरे आहेत हे ऐकून बाबल्याबरोबरच इतरांनाही आपण "अल्पसंख्यांक"नसल्याचा साक्षात्कार झाला.सरते शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंचानी जगातल्या अनेक प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची नावे सांगितली,पैकी अमेरिकेचे बराक ओबामा,आपला अमिताभ आणि सौरभ गांगुली यांची नावे सोडून इतर नावे कोणालाच समजली नाहीत कारण अध्यक्षांकडून त्या अवघड इग्लिश नावांचे उच्चार आणि नावे-आडनावे एकमेकात बेमालूमपणे मिक्स झाली होती.फक्त अमेरिकेचे बरेच अध्यक्ष हे डावखुरे होते हे समजल्यावर आपण इंडियात जन्मलो ही (आईबाबांची) मोठी चूक झाल्याचे बाबल्याने अनेकांजवळ बोलून दाखवले.आभाराच्या भाषणाने कार्यक्रम संपला.डाव्या हाताने प्लेट मधला चिवडा खाताखाता बाबल्याने हळूच अध्यक्षांना विचारले,
"अध्यक्षानु...आता "पायाळू"लोकांचो सत्कार कधी?....नाय ..माझे दोनव झील "पायाळू"आसत म्हणान इचारलयं"..
आणि तंटामुक्ती अध्यक्षांना सत्कारासाठीचा "नवीन" विषय मिळाला.....
No comments:
Post a Comment