"वर्तमानपत्र"......
काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......
काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......


