"सुट्टी उन्हाळ्याची"……
उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की मोठ्या शहरांप्रमाणे आमच्या कोकणातही हल्ली मुलांसाठी वेगवेगळी शिबिरे सुरु होतात. मग आमचे पालकही दहा पंधरा दिवसांच्या त्या शिबिरांमध्ये आपल्या लाडक्यांना "शिबिरार्थी" म्हणून दाखल करतात आणि मुलांप्रती मोठे कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात असतात. जी मुले शिबिरांमध्ये जात नाहीत ती फारतर काका मामांकडे जातात कीवा मोबाईल गेम आणि टीव्ही समोर रमतात.(आमचीही मुले याला अपवाद नाहीत) खरंतर कोकणच्या दृष्टीने ही उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांना निसर्गाशी मैत्री करण्याची सुसंधी देणारी असते.
काही वर्षांपुर्वीपर्यंत मुले या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असत. मात्र दुर्दैवाने आता ती स्थिती राहिली नाही.राहतो त्या वाडीत एखादी दाट झाडी पाहून तिथे स्वतः एखादी झोपडी उभारायची, त्यात दिवसभर वेगवेगळे खेळ खेळायचे,एखाद्याच्या वडीलांची जुनी पुरानी सायकल आणून पाळीपाळीने सगळ्यांनी रपेट मारायची,मध्येच जवळच्या आंब्यावर दगड मारून पिकलेले आंबे पाडायचे.पिकलेल्या आंब्यांसोबत पडलेल्या कच्च्या कैऱ्यांची मस्त "खिरमट"बनवायची.त्यासाठी लागणारे मीठ आणि गुळ घरातून गपचूप आणायचे,प्रसंगी घरातून ओरडून घ्यायचे. संध्याकाळच्या वेळी करवंदीच्या काट्याकुट्यात फिरायचे आणि यथेच्छ करवंद खायची. त्यावेळी पायात घुसलेला काटा दुसऱ्या काट्याने अलगद काढायचा.
मोठ्यांची नजर चुकवून जांभळीच्या झाडावर चढायचे कीवा पडलेली जांभळे गोळा करून मीठ लावून खायची या धावपळीत कपड्याची निळी रंगपंचमी ओघाने यायचीच त्याची मज्जा आणि वेगळीच,अश्याप्रकारेच चारांच्या बिया वेचून आणायच्या त्या फोडून बरणीत भरून पुढची बेगमी करायची,
आंब्या काजूच्या डीन्काने हात खराब करायचे,त्या डीन्काची चेहऱ्यावर,हातापायावर एखादी खुण राहील याची सुद्धा तजवीज या उपद्यापातून करायची,पाणी आटत आलेल्या एखाद्या डबक्यातल्या चिखलातून मित्रांबरोबर मासे पकडायचे आणि पानातून आपला वाटा घेऊन घरी मोठ्या रुबाबात यायचे. असे नानाविध प्रकार त्यावेळी चालत असत आणि मुलांना निसर्गाशी एकरूप होता येत असे.
आता खरोखरच हे सर्व शिकण्यासाठी किवा अनुभवण्यासाठी या प्रकारचे एखादे "शिबीर"आयोजित करावे लागेल की काय अशी शंका येते.
उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की मोठ्या शहरांप्रमाणे आमच्या कोकणातही हल्ली मुलांसाठी वेगवेगळी शिबिरे सुरु होतात. मग आमचे पालकही दहा पंधरा दिवसांच्या त्या शिबिरांमध्ये आपल्या लाडक्यांना "शिबिरार्थी" म्हणून दाखल करतात आणि मुलांप्रती मोठे कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात असतात. जी मुले शिबिरांमध्ये जात नाहीत ती फारतर काका मामांकडे जातात कीवा मोबाईल गेम आणि टीव्ही समोर रमतात.(आमचीही मुले याला अपवाद नाहीत) खरंतर कोकणच्या दृष्टीने ही उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांना निसर्गाशी मैत्री करण्याची सुसंधी देणारी असते.
काही वर्षांपुर्वीपर्यंत मुले या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असत. मात्र दुर्दैवाने आता ती स्थिती राहिली नाही.राहतो त्या वाडीत एखादी दाट झाडी पाहून तिथे स्वतः एखादी झोपडी उभारायची, त्यात दिवसभर वेगवेगळे खेळ खेळायचे,एखाद्याच्या वडीलांची जुनी पुरानी सायकल आणून पाळीपाळीने सगळ्यांनी रपेट मारायची,मध्येच जवळच्या आंब्यावर दगड मारून पिकलेले आंबे पाडायचे.पिकलेल्या आंब्यांसोबत पडलेल्या कच्च्या कैऱ्यांची मस्त "खिरमट"बनवायची.त्यासाठी लागणारे मीठ आणि गुळ घरातून गपचूप आणायचे,प्रसंगी घरातून ओरडून घ्यायचे. संध्याकाळच्या वेळी करवंदीच्या काट्याकुट्यात फिरायचे आणि यथेच्छ करवंद खायची. त्यावेळी पायात घुसलेला काटा दुसऱ्या काट्याने अलगद काढायचा.
मोठ्यांची नजर चुकवून जांभळीच्या झाडावर चढायचे कीवा पडलेली जांभळे गोळा करून मीठ लावून खायची या धावपळीत कपड्याची निळी रंगपंचमी ओघाने यायचीच त्याची मज्जा आणि वेगळीच,अश्याप्रकारेच चारांच्या बिया वेचून आणायच्या त्या फोडून बरणीत भरून पुढची बेगमी करायची,
आंब्या काजूच्या डीन्काने हात खराब करायचे,त्या डीन्काची चेहऱ्यावर,हातापायावर एखादी खुण राहील याची सुद्धा तजवीज या उपद्यापातून करायची,पाणी आटत आलेल्या एखाद्या डबक्यातल्या चिखलातून मित्रांबरोबर मासे पकडायचे आणि पानातून आपला वाटा घेऊन घरी मोठ्या रुबाबात यायचे. असे नानाविध प्रकार त्यावेळी चालत असत आणि मुलांना निसर्गाशी एकरूप होता येत असे.
आता खरोखरच हे सर्व शिकण्यासाठी किवा अनुभवण्यासाठी या प्रकारचे एखादे "शिबीर"आयोजित करावे लागेल की काय अशी शंका येते.

No comments:
Post a Comment