"बाबल्याचा जनगण"
वेळ संध्याकाळची,आमच्या गावातल्या चौकात गप्पा मारत बसण्याची.............
आज नेहमीपेक्षा थोडे कमीच म्हणजे सात आठ जण जमलेले होते.गप्पांचा विषय होता परवा संपन्न झालेला "स्वातंत्र्यदिन" सोहळा.आम्ही जिल्ह्याच्या मुख्यालयाशेजारी रहात असल्याने स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य सोहळा आम्हांला पाहता आणि अनुभवता येतो.विशेष म्हणजे मंत्र्यांच्या भाषणातून आम्हांला आमचा जीडीपी आणि आमचे दरडोई उत्पन्न सुद्धा समजते.त्यामुळे या सोहळ्याचे कवित्व पुढचे आठ दिवस सुरु राहते.आज तसाच विषय सुरु होता,एवढ्यात कोणाच्यातरी मोटरसायकल वरून आमच्या बाबल्याचे आगमन झाले.बाबल्याची स्वतःची मोटरसायकल नाही परंतु जास्तीत जास्त वेळ तो कोणाची तरी मागची सीट अडवून असतो.ज्याप्रमाणे रमीच्या डावात एक पान असे असते की जे आपल्याला लागत नाही पण खाली टाकले तर दुसऱ्याला लागण्याची व त्याचा डाव पुरा होण्याची शक्यता असते अगदी तसाच "बाबल्या" हा विषय असल्याने जो तो नेहमी त्याला सांभाळत असतो.
आल्याआल्याच बाबल्या चर्चेत सहभागी झाला.पांढरा सदरा घालून,झेंड्याचा बिल्ला लावून परवा आपण किती ध्वजवंदनाला उपस्थित होतो त्याचे रसभरीत वर्णन सांगू लागला.इतक्यात आमच्यापैकी एकाला त्याची गम्मत करण्याची हुक्की आली.अशी बाबल्याची चेष्टा करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांची "आ बैल मुझे मार"अवस्था होते.तरीही का कुणास ठावूक नेहमीचे गिऱ्हाईक "बाबल्या"च असतो.
तो मित्र बाबल्याला म्हणाला..."बाबल्या,मेल्या इतकी मोठेपणा सांगतहस झेंडावंदनाची पण तुका साधा "राष्ट्रगीत"तरी म्हनाक येता काय ?".....
"येता म्हणजे..? पुरा पाठ हा...म्हणाव....?"असं म्हणून बाबल्या "झेंडा उंचा रहे हमारा"च्या दोन ओळी म्हणतो.तेवढ्यात कोणीतरी ते "ध्वजगीत"असल्याचे सांगून त्याला थांबवतो.
पहिल्याला बाबल्याचा कधी नव्हे तो पाडाव करण्याची आयती संधी आल्यासारखी वाटते ...तो म्हणतो "अरे राष्ट्रगीत म्हणजे "जनगण" म्हन ...आणि पुरा म्हनत आसशीत तर आपली शंभर रुपयाची पैज".....बाबल्या पैज जिंकण्याची शक्यताच नव्हती,कारण बऱ्याच भारतीयांप्रमाणे त्यालाही ते फक्त समूह्गीतात म्हणता येत असे.
हा जरी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असला तरी या घडीला मात्र त्याचा एकट्याचा होता,पण हार मानेल तर तो बाबल्या कसला....सगळ्या हसणाऱ्या मंडळींकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाबल्या डाफरला. " देशाच्या इतक्या पवित्र आणि मानाच्या राष्ट्रगीतावर ह्यो मेलो पैज लावता आणि ती पन शंभर रुपड्यांची ...आणि मेल्यानु तुमी हसतास,लाज नाय वाटत तुमका"...."देशात ह्या चल्ला काय ?..कोन झेंडो जाळता,कोन उलटो फडकवता,कोन हातात घेवक लाजता तर कोन कपाळाक गुंडाळता..ते मेले सगळे देशद्रोहीच ...आणि तेंच्याबरोबर तुमी ....पैजी खेळनारे...आग लागो तुमच्या तोंडाक"...
एका दमात एवढे बोलून,सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवून ज्याच्या मोटारसायकलवरून तो आला होता त्याच्याबरोबर पसार झाला.इकडे त्याच्या बोलल्याने "सावधान" मध्ये असलेल्या मंडळीनी "बाबल्या"च्या इरसालपणाला मनातल्या मनात एक "स्यालूट" ठोकला आणि "विश्राम" होत घराचा रस्ता धरला.
वेळ संध्याकाळची,आमच्या गावातल्या चौकात गप्पा मारत बसण्याची.............
आज नेहमीपेक्षा थोडे कमीच म्हणजे सात आठ जण जमलेले होते.गप्पांचा विषय होता परवा संपन्न झालेला "स्वातंत्र्यदिन" सोहळा.आम्ही जिल्ह्याच्या मुख्यालयाशेजारी रहात असल्याने स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य सोहळा आम्हांला पाहता आणि अनुभवता येतो.विशेष म्हणजे मंत्र्यांच्या भाषणातून आम्हांला आमचा जीडीपी आणि आमचे दरडोई उत्पन्न सुद्धा समजते.त्यामुळे या सोहळ्याचे कवित्व पुढचे आठ दिवस सुरु राहते.आज तसाच विषय सुरु होता,एवढ्यात कोणाच्यातरी मोटरसायकल वरून आमच्या बाबल्याचे आगमन झाले.बाबल्याची स्वतःची मोटरसायकल नाही परंतु जास्तीत जास्त वेळ तो कोणाची तरी मागची सीट अडवून असतो.ज्याप्रमाणे रमीच्या डावात एक पान असे असते की जे आपल्याला लागत नाही पण खाली टाकले तर दुसऱ्याला लागण्याची व त्याचा डाव पुरा होण्याची शक्यता असते अगदी तसाच "बाबल्या" हा विषय असल्याने जो तो नेहमी त्याला सांभाळत असतो.
आल्याआल्याच बाबल्या चर्चेत सहभागी झाला.पांढरा सदरा घालून,झेंड्याचा बिल्ला लावून परवा आपण किती ध्वजवंदनाला उपस्थित होतो त्याचे रसभरीत वर्णन सांगू लागला.इतक्यात आमच्यापैकी एकाला त्याची गम्मत करण्याची हुक्की आली.अशी बाबल्याची चेष्टा करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांची "आ बैल मुझे मार"अवस्था होते.तरीही का कुणास ठावूक नेहमीचे गिऱ्हाईक "बाबल्या"च असतो.
तो मित्र बाबल्याला म्हणाला..."बाबल्या,मेल्या इतकी मोठेपणा सांगतहस झेंडावंदनाची पण तुका साधा "राष्ट्रगीत"तरी म्हनाक येता काय ?".....
"येता म्हणजे..? पुरा पाठ हा...म्हणाव....?"असं म्हणून बाबल्या "झेंडा उंचा रहे हमारा"च्या दोन ओळी म्हणतो.तेवढ्यात कोणीतरी ते "ध्वजगीत"असल्याचे सांगून त्याला थांबवतो.
पहिल्याला बाबल्याचा कधी नव्हे तो पाडाव करण्याची आयती संधी आल्यासारखी वाटते ...तो म्हणतो "अरे राष्ट्रगीत म्हणजे "जनगण" म्हन ...आणि पुरा म्हनत आसशीत तर आपली शंभर रुपयाची पैज".....बाबल्या पैज जिंकण्याची शक्यताच नव्हती,कारण बऱ्याच भारतीयांप्रमाणे त्यालाही ते फक्त समूह्गीतात म्हणता येत असे.
हा जरी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असला तरी या घडीला मात्र त्याचा एकट्याचा होता,पण हार मानेल तर तो बाबल्या कसला....सगळ्या हसणाऱ्या मंडळींकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाबल्या डाफरला. " देशाच्या इतक्या पवित्र आणि मानाच्या राष्ट्रगीतावर ह्यो मेलो पैज लावता आणि ती पन शंभर रुपड्यांची ...आणि मेल्यानु तुमी हसतास,लाज नाय वाटत तुमका"...."देशात ह्या चल्ला काय ?..कोन झेंडो जाळता,कोन उलटो फडकवता,कोन हातात घेवक लाजता तर कोन कपाळाक गुंडाळता..ते मेले सगळे देशद्रोहीच ...आणि तेंच्याबरोबर तुमी ....पैजी खेळनारे...आग लागो तुमच्या तोंडाक"...
एका दमात एवढे बोलून,सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवून ज्याच्या मोटारसायकलवरून तो आला होता त्याच्याबरोबर पसार झाला.इकडे त्याच्या बोलल्याने "सावधान" मध्ये असलेल्या मंडळीनी "बाबल्या"च्या इरसालपणाला मनातल्या मनात एक "स्यालूट" ठोकला आणि "विश्राम" होत घराचा रस्ता धरला.
No comments:
Post a Comment