"बाबल्या"ची वाय फाय सेवा"......
कणकवलीत राणेंची,सावंतवाडीत तेलींची आणि वेंगुर्ल्यात गावडे यांची "वाय-फाय"सेवा सुरु झाली आणि त्यावेळेपासून बाबल्याच्या डोक्यात वाय फाय चा किडा वळवळू लागला.मुळात इंटरनेट या विषयीत बाबल्या पूर्ण अनभिज्ञ होता पण कोणत्याही नवीन गोष्टीची त्याला प्रचंड जिज्ञासा आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे या सर्व प्रकाराविषयी त्याने माझ्याकडून लगेच माहिती घेतली.(अर्थात मला आहे तेवढी) माझ्या दृष्टीने वायफायचा तो विषय तिथेच संपला पण बाबल्याच्या सुपीक डोक्यात एका वेगळ्या कल्पनेने आकार घेतला.
बाबल्याचे सामायिक घर आहे आणि मोठा परिवार आहे पण सर्व मंडळी कामधंद्यानिमित्त मुंबई निवासी.चतुर्थी आणि मे महिन्याच्या सुट्टीत फक्त घर गोकुळ असते,बाकी शुकशुकाट.त्या घरातल्याच एका खोलीत हल्लीच बाबल्याने एक ब्याचलर भाडेकरू ठेवला आहे.चांगल्या हुद्द्यावर असल्याने त्याच्याकडे वायफाय सुविधा असलेले ब्रॉडब्यांड"कनेक्शन आहे,ज्याचा प्लान अनलिमिटेड सदरातला आहे.ही बातमी बाबल्याला समजली.
माझ्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे बाबल्याने भाडेकरूसोबत सेटिंग केले आणि चतुर्थीच्या काळात एक महिन्यासाठी ते आपल्या घरात वापरायला देण्याचे कबुल करून घेतले ज्याचे महिना बिल रुपये पाचशे पंचेचाळीस भाड्याच्या रकमेतून वळते करून घ्यायचे दोघांच्या एमओयु मध्ये ठरले.करार झाला आणि बाबल्याने ही गोष्ट आपल्या चाकरमान्यांकडे जाहीर करून टाकली,की यंदा चतुर्थीत सर्वांना माझ्याकडून मोफत वायफाय सेवा मिळणार.याचा परिणाम असा झाला की यंदाच्या चतुर्थीत त्याच्या घरी येणारया चाकरमानी मंडळीची संख्या त्यांच्या मुलाबाळांच्या येण्याने दुप्पट झाली.इकडे चाकरमानी मंडळी गावी आल्याआल्या बाबल्याने आपल्या नावाचा "पासवर्ड" सर्वांना देऊन टाकला आणि सर्व मंडळी खूष होऊन फेसबुक वाटसअप मध्ये गढून गेली.
पुढे बाबल्याच्या मोफत वायफाय सेवेची चर्चा आमच्या गावभर पसरली.संध्याकाळच्या आरतीला यायला कुरबुर करणारी पोरेटोरे आता बाबल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीला हजेरी लाऊ लागली.एक दोन आरत्या म्हणून त्यांना अपेक्षित असलेली"तसली भजने"डाऊनलोड करू लागली.बरीचशी अप्लिकेशन "अपडेट" करू लागली.
एकंदरीत एरव्ही सामसूमीत जाणारा बाबल्याचा "गणेशोत्सव"यंदा दणक्यात आणि त्याच्या कौतुकात संपन्न झाला तो केवळ मोफत वायफाय सेवा देण्याच्या फक्त ५४५ रुपयांच्या बाबल्याच्या आयडीयेनेच ......
कणकवलीत राणेंची,सावंतवाडीत तेलींची आणि वेंगुर्ल्यात गावडे यांची "वाय-फाय"सेवा सुरु झाली आणि त्यावेळेपासून बाबल्याच्या डोक्यात वाय फाय चा किडा वळवळू लागला.मुळात इंटरनेट या विषयीत बाबल्या पूर्ण अनभिज्ञ होता पण कोणत्याही नवीन गोष्टीची त्याला प्रचंड जिज्ञासा आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे या सर्व प्रकाराविषयी त्याने माझ्याकडून लगेच माहिती घेतली.(अर्थात मला आहे तेवढी) माझ्या दृष्टीने वायफायचा तो विषय तिथेच संपला पण बाबल्याच्या सुपीक डोक्यात एका वेगळ्या कल्पनेने आकार घेतला.
बाबल्याचे सामायिक घर आहे आणि मोठा परिवार आहे पण सर्व मंडळी कामधंद्यानिमित्त मुंबई निवासी.चतुर्थी आणि मे महिन्याच्या सुट्टीत फक्त घर गोकुळ असते,बाकी शुकशुकाट.त्या घरातल्याच एका खोलीत हल्लीच बाबल्याने एक ब्याचलर भाडेकरू ठेवला आहे.चांगल्या हुद्द्यावर असल्याने त्याच्याकडे वायफाय सुविधा असलेले ब्रॉडब्यांड"कनेक्शन आहे,ज्याचा प्लान अनलिमिटेड सदरातला आहे.ही बातमी बाबल्याला समजली.
माझ्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे बाबल्याने भाडेकरूसोबत सेटिंग केले आणि चतुर्थीच्या काळात एक महिन्यासाठी ते आपल्या घरात वापरायला देण्याचे कबुल करून घेतले ज्याचे महिना बिल रुपये पाचशे पंचेचाळीस भाड्याच्या रकमेतून वळते करून घ्यायचे दोघांच्या एमओयु मध्ये ठरले.करार झाला आणि बाबल्याने ही गोष्ट आपल्या चाकरमान्यांकडे जाहीर करून टाकली,की यंदा चतुर्थीत सर्वांना माझ्याकडून मोफत वायफाय सेवा मिळणार.याचा परिणाम असा झाला की यंदाच्या चतुर्थीत त्याच्या घरी येणारया चाकरमानी मंडळीची संख्या त्यांच्या मुलाबाळांच्या येण्याने दुप्पट झाली.इकडे चाकरमानी मंडळी गावी आल्याआल्या बाबल्याने आपल्या नावाचा "पासवर्ड" सर्वांना देऊन टाकला आणि सर्व मंडळी खूष होऊन फेसबुक वाटसअप मध्ये गढून गेली.
पुढे बाबल्याच्या मोफत वायफाय सेवेची चर्चा आमच्या गावभर पसरली.संध्याकाळच्या आरतीला यायला कुरबुर करणारी पोरेटोरे आता बाबल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीला हजेरी लाऊ लागली.एक दोन आरत्या म्हणून त्यांना अपेक्षित असलेली"तसली भजने"डाऊनलोड करू लागली.बरीचशी अप्लिकेशन "अपडेट" करू लागली.
एकंदरीत एरव्ही सामसूमीत जाणारा बाबल्याचा "गणेशोत्सव"यंदा दणक्यात आणि त्याच्या कौतुकात संपन्न झाला तो केवळ मोफत वायफाय सेवा देण्याच्या फक्त ५४५ रुपयांच्या बाबल्याच्या आयडीयेनेच ......
No comments:
Post a Comment