"वो पच्चीस साल"…
१६ ऑगस्ट १९८८…. साधारण दुपारचे तीन वाजले असावेत,आमची स्वारी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या वसतिगृहात दाखल झाली. कॉलेज सुरु व्हायला अजून १/२ दिवसाचा अवकाश होता,त्यामुळे रूम मधल्या तीन पार्टनर पैकी दोघे अजून यायचे होते. आम्ही आमच्या सामानाची ट्रंक रूम नं ३ मध्ये टाकून त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या कॉट,टेबल आणि खुर्चीचा ताबा घेतला. इतर दैनंदिन व्यवस्था पाहून मेससाठी रजिस्टर झlलो.
एव्हाना प्रवेशा दरम्यान बऱ्याचदा कॉलेज पाहून झालं होत,पण आता पुढची तीन वर्षे शिकायची असल्याने पुन्हा एकदा इमारतीचा काना-कोपरा पाहून घ्यावा असं मनात आलं,वसतिगृहातून निघालो असता कॉलेजच्या गेटजवळचा परिसर बटाटावड्याच्या खमंग वासाने व्यापून गेला होता. तो होता "शामचा वडा" … ज्याने पुढची तीन वर्षे आम्हाला कुपोषणापासून दूर ठेवलं. सव्वा रुपयाचा तो जम्बो वडा हादडताना अख्खं तोंड भाजून घेतलं. विद्यार्थ्यांच्या वर्दळीपासून मोकळा असलेला कॉलेजचा सगळा परिसर नजरे खालून घातला आणि पुढची किमान तीन वर्षे "जिना यहा… मरना यहा" याची खूणगाठ नक्की केली.
हे सगळे आज आठवण्याचे कारण म्हणजे काल १६ ऑगस्ट २०१३ होता. बरोबर २५ वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाऊन या सगळ्या स्मृतीना उजाळा दिला. एक इमारत आणि एकच वर्कशोप असलेल्या कम्पसमध्ये आता भरपूर इमारती वसलेल्या आहेत. पण आनंदाची बाब म्हणजे सगळा परिसर अजूनही पूर्वीप्रमाणेच हिरवागार आहे. आमच्या वसतिगृहाच्या सोबतीला सुद्धा दुसरी इमारत आली, शाम आणि शामचा वडा अजूनही पूर्वीसारखेच आहेत (फक्त किंमत १५ वर गेलीय काळानुरूप ) एक मामा भेटले,एक-दोन सरांची भेट झाली,अगदी नाव पत्यासहित सरांनी ओळखलं. वर म्हणाले सुद्धा कि २०/२५ वर्षापूर्वीची अख्खी ब्याच आठवते पण अलीकडच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अस घडत नाही,नक्की कोण कमी पडतंय माहित नाही पण तो "भाव" आता राहिला नाही. मग मागोमाग बऱ्याच आठवणींच्या खपल्या निघाल्या,काही आनंदाच्या तर काही वेदनेच्या …… असा हा कालचा "रौप्य महोत्सवी" दिवस मला योगायोगाने सार्थकी लावता आला ….
१६ ऑगस्ट १९८८…. साधारण दुपारचे तीन वाजले असावेत,आमची स्वारी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या वसतिगृहात दाखल झाली. कॉलेज सुरु व्हायला अजून १/२ दिवसाचा अवकाश होता,त्यामुळे रूम मधल्या तीन पार्टनर पैकी दोघे अजून यायचे होते. आम्ही आमच्या सामानाची ट्रंक रूम नं ३ मध्ये टाकून त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या कॉट,टेबल आणि खुर्चीचा ताबा घेतला. इतर दैनंदिन व्यवस्था पाहून मेससाठी रजिस्टर झlलो.
एव्हाना प्रवेशा दरम्यान बऱ्याचदा कॉलेज पाहून झालं होत,पण आता पुढची तीन वर्षे शिकायची असल्याने पुन्हा एकदा इमारतीचा काना-कोपरा पाहून घ्यावा असं मनात आलं,वसतिगृहातून निघालो असता कॉलेजच्या गेटजवळचा परिसर बटाटावड्याच्या खमंग वासाने व्यापून गेला होता. तो होता "शामचा वडा" … ज्याने पुढची तीन वर्षे आम्हाला कुपोषणापासून दूर ठेवलं. सव्वा रुपयाचा तो जम्बो वडा हादडताना अख्खं तोंड भाजून घेतलं. विद्यार्थ्यांच्या वर्दळीपासून मोकळा असलेला कॉलेजचा सगळा परिसर नजरे खालून घातला आणि पुढची किमान तीन वर्षे "जिना यहा… मरना यहा" याची खूणगाठ नक्की केली.
हे सगळे आज आठवण्याचे कारण म्हणजे काल १६ ऑगस्ट २०१३ होता. बरोबर २५ वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाऊन या सगळ्या स्मृतीना उजाळा दिला. एक इमारत आणि एकच वर्कशोप असलेल्या कम्पसमध्ये आता भरपूर इमारती वसलेल्या आहेत. पण आनंदाची बाब म्हणजे सगळा परिसर अजूनही पूर्वीप्रमाणेच हिरवागार आहे. आमच्या वसतिगृहाच्या सोबतीला सुद्धा दुसरी इमारत आली, शाम आणि शामचा वडा अजूनही पूर्वीसारखेच आहेत (फक्त किंमत १५ वर गेलीय काळानुरूप ) एक मामा भेटले,एक-दोन सरांची भेट झाली,अगदी नाव पत्यासहित सरांनी ओळखलं. वर म्हणाले सुद्धा कि २०/२५ वर्षापूर्वीची अख्खी ब्याच आठवते पण अलीकडच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अस घडत नाही,नक्की कोण कमी पडतंय माहित नाही पण तो "भाव" आता राहिला नाही. मग मागोमाग बऱ्याच आठवणींच्या खपल्या निघाल्या,काही आनंदाच्या तर काही वेदनेच्या …… असा हा कालचा "रौप्य महोत्सवी" दिवस मला योगायोगाने सार्थकी लावता आला ….
No comments:
Post a Comment