Friday, August 9, 2013

" सांग सांग भोलानाथ" …….

" सांग सांग भोलानाथ" ……. 
शाळेमध्ये इतर कितीही सुट्ट्या मिळाल्या आणि वरून हवी तेव्हा "दांडी"मारता येत असली तरी,पावसामुळे अचानकपणे १/२ सुट्ट्या हमखास मिळाव्यात,आणि त्या पावसातच "एन्जॉय"कराव्यात हे विद्यार्थी असतानाचे प्रत्येकाचे स्वप्न असेल,शिक्षण पद्धती बदलली,मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या,खेळांचे प्रकार बदलले तरी हि भोलानाथ महाराजाकडे केली जाणारी ही "इन्क्वायरी" अजूनही प्रत्येक बालमन मनातल्या मनात का होईना पण करतच असावं.
काल कोकणात मुसळधार पाऊस झाला,रात्री तर सरीवर सारी कोसळत होत्या, तेव्हा माझी सुकन्या अभ्यास करता करता सारखा एकच प्रश्न विचारायची "पप्पा उद्या पीठढवळ नदीच्या पुलावर पाणी येईल का?" मी होय /नाही /बघूया अशी बेफिकीर उत्तरं देत असतानाच टीव्ही वर त्या पुलावर पाणी येउन वाहतूक ठप्प झाल्याची बातमी आली,ती प्रचंड खूष झाली. कारण तिला आज पावसाची सुट्टी मिळण्याची शक्यता होती. आ
णि या हक्काच्या सुट्टीसाठीच ती मला "भोलानाथ" समजून सतावत होती. 

No comments:

Post a Comment