अभिनय आणि शिल्पकला एकाच "बॉडीत" …….
कोकण म्हटलं कि ज्या काही गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यातली सर्वात महत्वाची अशी कोकणची लोककला म्हणजे "दशावतार"…. पूर्वीच्या काळी फक्त जत्रेतूनच ह्या दशावताराचे प्रयोग पाहण्याचे योग यायचे पण आता सर्सास छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून हे प्रयोग "एन्जॉय" करता येतात. कोणत्याही प्रकारचे नेपथ्य, लिखित संहिता अथवा रिहर्सल नसताना ही दशावतारी मंडळी पौराणिक तसेच काल्पनिक कथानकाचे प्रयोग लीलया पार पाडतात,वरून रंगभूषाकार /वेशभूषाकार स्वतःच …
सादरीकरणातला त्यांचा जोश इतका असतो कि पाहणाराही आपलं अंग लयीत हलवत त्या भूमिकेत शिरतो. इतकं सगळ असूनही आमच्या दशावताराची स्थिती "रात्रीचो राजा…. आणि सकाळी कपाळावर बोजा" अशीच आहे. नाही म्हणायला वेगवेगळ्या प्रयोगानी हल्ली परिस्थिती थोडी सुधारतेय पण …….
पूर्वीपासून दशावतारी मंडळीना पावसाळ्यात हक्काची ( की सक्तीची) रजा असते,परिणामी हि मंडळी पावसाळ्यापुरता पूरक कामधंदा करतात,यातल्या बऱ्याच जणांच्या स्वतःच्या गणपतीच्या शाळा (कारखाने)आहेत,तर काहीजण दुसऱ्या शाळेत काम करतात.अभिनय आणि शिल्पकारीतेचा हा अनोखा संगम असावा.
गेली पन्नास वर्षे या दशावतारी रंगभूमीशी ज्यांची नाळ जोडलेली आहे त्या "कांता मेस्त्री" या जेष्ठ रंगकर्मी यांच्या घरी त्यांची भेट झाली. चतुर्थीला उणापुरा महिनाच शिल्लक असल्याने ते आपली दोन कलाकार मुलांसह मूर्ती कामात व्यस्त होते, त्याचं या क्षेत्रात मोठे योगदान आहे, ६५ ते ९० या काळात त्यांनी "राजपार्ट" म्हणून भूमिका केल्या आणि नव्वद नंतर आजपावेतो "नारद"…… जिल्ह्यात त्यांचा "नारद" फार प्रसिद्ध आहे आणि विविध स्पर्धांमध्ये तो पुरस्कार प्राप्त ठरलेला आहे,कांता काका सांगत होते वडिलांकडून आलेला वारसा मी जपलाच पण माझ्या दोन मुलानाही या क्षेत्रात आणले,मुलगीलाही "बाळ गोपाळ" दशावतार मंडळातून या कलेशी जोडले होते,तासाभराच्या भेटीत दशावताराचे अनेक पैलू ऐकायला मिळणे हि आमच्या दृष्टीने फार मोठी मेजवानी होती.
(कोकणचा दशावतार आधीचा की कानडी यक्षगान आधीचे यावर मतमतांतरे असू शकतात,आपला तो विषय नाही पण त्या कानडी रसिकांनी "यक्षगान" हि लोककला फार उंचीवर नेउन ठेवली,आपल्याला मात्र अजून यासाठी सकारात्मक काम करण्याची गरज आहे हे मान्य करावे लागेल. असो, मात्र इथल्या कलाकारांनी अनंत अडचणीतूनही हि लोककला प्राणपणाने जिवंत ठेवली हे फार कौतुकास्पद आणि महत्वाचे.....)
कोकण म्हटलं कि ज्या काही गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यातली सर्वात महत्वाची अशी कोकणची लोककला म्हणजे "दशावतार"…. पूर्वीच्या काळी फक्त जत्रेतूनच ह्या दशावताराचे प्रयोग पाहण्याचे योग यायचे पण आता सर्सास छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून हे प्रयोग "एन्जॉय" करता येतात. कोणत्याही प्रकारचे नेपथ्य, लिखित संहिता अथवा रिहर्सल नसताना ही दशावतारी मंडळी पौराणिक तसेच काल्पनिक कथानकाचे प्रयोग लीलया पार पाडतात,वरून रंगभूषाकार /वेशभूषाकार स्वतःच …
सादरीकरणातला त्यांचा जोश इतका असतो कि पाहणाराही आपलं अंग लयीत हलवत त्या भूमिकेत शिरतो. इतकं सगळ असूनही आमच्या दशावताराची स्थिती "रात्रीचो राजा…. आणि सकाळी कपाळावर बोजा" अशीच आहे. नाही म्हणायला वेगवेगळ्या प्रयोगानी हल्ली परिस्थिती थोडी सुधारतेय पण …….
पूर्वीपासून दशावतारी मंडळीना पावसाळ्यात हक्काची ( की सक्तीची) रजा असते,परिणामी हि मंडळी पावसाळ्यापुरता पूरक कामधंदा करतात,यातल्या बऱ्याच जणांच्या स्वतःच्या गणपतीच्या शाळा (कारखाने)आहेत,तर काहीजण दुसऱ्या शाळेत काम करतात.अभिनय आणि शिल्पकारीतेचा हा अनोखा संगम असावा.
गेली पन्नास वर्षे या दशावतारी रंगभूमीशी ज्यांची नाळ जोडलेली आहे त्या "कांता मेस्त्री" या जेष्ठ रंगकर्मी यांच्या घरी त्यांची भेट झाली. चतुर्थीला उणापुरा महिनाच शिल्लक असल्याने ते आपली दोन कलाकार मुलांसह मूर्ती कामात व्यस्त होते, त्याचं या क्षेत्रात मोठे योगदान आहे, ६५ ते ९० या काळात त्यांनी "राजपार्ट" म्हणून भूमिका केल्या आणि नव्वद नंतर आजपावेतो "नारद"…… जिल्ह्यात त्यांचा "नारद" फार प्रसिद्ध आहे आणि विविध स्पर्धांमध्ये तो पुरस्कार प्राप्त ठरलेला आहे,कांता काका सांगत होते वडिलांकडून आलेला वारसा मी जपलाच पण माझ्या दोन मुलानाही या क्षेत्रात आणले,मुलगीलाही "बाळ गोपाळ" दशावतार मंडळातून या कलेशी जोडले होते,तासाभराच्या भेटीत दशावताराचे अनेक पैलू ऐकायला मिळणे हि आमच्या दृष्टीने फार मोठी मेजवानी होती.
(कोकणचा दशावतार आधीचा की कानडी यक्षगान आधीचे यावर मतमतांतरे असू शकतात,आपला तो विषय नाही पण त्या कानडी रसिकांनी "यक्षगान" हि लोककला फार उंचीवर नेउन ठेवली,आपल्याला मात्र अजून यासाठी सकारात्मक काम करण्याची गरज आहे हे मान्य करावे लागेल. असो, मात्र इथल्या कलाकारांनी अनंत अडचणीतूनही हि लोककला प्राणपणाने जिवंत ठेवली हे फार कौतुकास्पद आणि महत्वाचे.....)

No comments:
Post a Comment