Tuesday, January 21, 2014

"यवजलेला साधात तर दळीदार कित्या बाधात"……

"यवजलेला साधात तर दळीदार कित्या बाधात"……
अशी आमच्या मालवणीत एक सुंदर म्हण आहे. आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट जर साध्य झाली तर दारिद्र्याची बाधा होण्याचा प्रश्नच येणार नाही असा काहीसा या म्हणीचा अर्थ आहे.आता ही म्हण अरविंद केजरीवाल साहेबांना कोणीतरी हिंदीतून सांगायला हवी,कारण त्यांनी कागदावर मांडलेली प्रत्येक गोष्ट लगेचच साध्य व्हायला हवी किवा अंमलात यायलाच हवी असा त्यांचा अट्टाहास सुरु आहे आणि त्यातून लोकांचा टाइमपास…त्यामुळे जनतेला एखादा नवीन "नायक" पाहिल्याचा "फील" येऊ लागलाय. 
भ्रष्टाचार विरहित एक चांगले सुशासन देण्याचा त्यांचा विचार अगदी योग्य असला तरी तो टप्प्याटप्प्याने आणि सनदशीर मार्गाने अंमलात आणला पाहिजे. स्वतः सत्तेत असल्याने प्रत्येक मुद्द्यावर जनतेकडून एस एम एस मागवून किवा जनतेला रस्त्यावर उतरवून वेठीस धरण्याचे काम करणे रास्त नाही.पक्षाचे नाव आणि नेते जरी "आम"असले तरी जी पदे उपभोगत आहेत त्या पदांना घटनेने "खास"असा दर्जा दिलेला आहे.त्या दर्जाविषयी काही संकेत आहेत ते पाळायलाच हवेत……

No comments:

Post a Comment