"बाईंचा रुमाल"
एखादे संस्काराचे पुस्तक वाचून किती "संस्कारक्षम" होता येईल हे नक्की सांगता येत नाही, परंतु आयुष्यात जर बालमनावर "संस्कार" करणाऱ्या काही घटना घडल्या तर मात्र त्याचा एक "स्पेशल इफेक्ट" आयुष्यभर राहतो हे आपण अनुभवाने सांगू शकतो.
त्यावेळी आमचे गावात एक घर होते पण आम्ही गावापासून दूर शेतावरच्या घरात रहात होतो.राहत्या घरापासून गावची प्राथमिक शाळा सुमारे तीन मैल लांब होती.शाळा दोन वेळ असल्याने जात्या येत्या मिळून चार खेपा म्हणजे माझ्या दृष्टीने तसे अवघडच काम होते. नेमके त्याच दरम्यान एका नवविवाहित शिक्षक जोडप्याची आमच्या शाळेत बदली झाली.त्यांचे नाव होते सौ व श्री सुरेंद्रनाथ परमानंद ढवळे आणि व्यक्तिमत्व सुद्धा नावाला शोभेल असे भारदस्त होते.आमच्या गावातल्या घरी त्यांची राहण्याची सोय होऊ शकते असे सहकारी शिक्षकांनी त्यांना सुचवले आणि उभयता आमच्याकडे चौकशीला आली.
त्याकाळी घरात शिक्षकाचे वास्तव्य हि अभिमानाची बाब असल्याने आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.घरभाडे असाही विषय आमच्याकडून आला नाही पण त्यांना काहीतरी द्यावे असे वाटले आणि त्यांनी शिक्षणासाठी म्हणून माझे "पालकत्व" स्वीकारले.
आमची रवानगी त्याचदिवशी त्यांच्यासोबत गावातल्या घरात करण्यात आली.ढवळे उभयता "आईवडील"झाले आणि शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु झाला.
आमच्या शाळेच्या समोर एक बांध होता,ती आमची मधल्या सुटीत खेळण्याची जागा.एक दिवस पकडापकडी खेळताना मी पडलो आणि उजवा गुढगा रक्तबंबाळ झाला.खिशातल्या छोटाश्या रुमालाने जखम बांधून मी ढवळे बाईंकडे गेलो,अपेक्षा होती की बाई जवळ घेतील आणि डोळे पुसतील.पण झाले भलतेच…. बाईनी कानाखाली आवाज काढला.आणि तंबी दिली "हा रुमाल जिथून घेतला तिथे नेउन ठेव आणि मगच माझ्याकडे ये"…. एरव्ही मला जीव की प्राण करणाऱ्या बाईंचा हा अवतार बघून सगळे शिक्षक अवाक झाले.मला मात्र चूक कळलेली होती,मोठ्या माणसांप्रमाणे आपल्याही खिशात रुमाल असावा म्हणून मी "बाईंचा रुमाल" चोरला होता. जो त्यांनी ओळखला.
त्याच अवस्थेत मी घरी गेलो.पुढचे आठ दिवस सुश्रुषा अर्थात बाईनीच केली.जखम बरी झाली पण व्रण म्हणून शरीरावर आणि संस्कार म्हणून मनावर तो प्रसंग कायम स्वरूपी कोरला गेला.
आजकाल खेळातला आईचा रुमाल कायमचा हरवला आणि असे संस्कार देणारा बाईंचा रुमाल सुद्धा दुर्मिळ झाला आहे.आपल्या पिढीला हे वाचून एखादा प्रसंग हमखास आठवेल पण चिंता वाटते ती येणाऱ्या पिढीची …
खरंच त्यांच्याकडे असे काही लिहिण्या-सांगण्या सारखे असेल ना ?
एखादे संस्काराचे पुस्तक वाचून किती "संस्कारक्षम" होता येईल हे नक्की सांगता येत नाही, परंतु आयुष्यात जर बालमनावर "संस्कार" करणाऱ्या काही घटना घडल्या तर मात्र त्याचा एक "स्पेशल इफेक्ट" आयुष्यभर राहतो हे आपण अनुभवाने सांगू शकतो.
त्यावेळी आमचे गावात एक घर होते पण आम्ही गावापासून दूर शेतावरच्या घरात रहात होतो.राहत्या घरापासून गावची प्राथमिक शाळा सुमारे तीन मैल लांब होती.शाळा दोन वेळ असल्याने जात्या येत्या मिळून चार खेपा म्हणजे माझ्या दृष्टीने तसे अवघडच काम होते. नेमके त्याच दरम्यान एका नवविवाहित शिक्षक जोडप्याची आमच्या शाळेत बदली झाली.त्यांचे नाव होते सौ व श्री सुरेंद्रनाथ परमानंद ढवळे आणि व्यक्तिमत्व सुद्धा नावाला शोभेल असे भारदस्त होते.आमच्या गावातल्या घरी त्यांची राहण्याची सोय होऊ शकते असे सहकारी शिक्षकांनी त्यांना सुचवले आणि उभयता आमच्याकडे चौकशीला आली.
त्याकाळी घरात शिक्षकाचे वास्तव्य हि अभिमानाची बाब असल्याने आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.घरभाडे असाही विषय आमच्याकडून आला नाही पण त्यांना काहीतरी द्यावे असे वाटले आणि त्यांनी शिक्षणासाठी म्हणून माझे "पालकत्व" स्वीकारले.
आमची रवानगी त्याचदिवशी त्यांच्यासोबत गावातल्या घरात करण्यात आली.ढवळे उभयता "आईवडील"झाले आणि शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु झाला.
आमच्या शाळेच्या समोर एक बांध होता,ती आमची मधल्या सुटीत खेळण्याची जागा.एक दिवस पकडापकडी खेळताना मी पडलो आणि उजवा गुढगा रक्तबंबाळ झाला.खिशातल्या छोटाश्या रुमालाने जखम बांधून मी ढवळे बाईंकडे गेलो,अपेक्षा होती की बाई जवळ घेतील आणि डोळे पुसतील.पण झाले भलतेच…. बाईनी कानाखाली आवाज काढला.आणि तंबी दिली "हा रुमाल जिथून घेतला तिथे नेउन ठेव आणि मगच माझ्याकडे ये"…. एरव्ही मला जीव की प्राण करणाऱ्या बाईंचा हा अवतार बघून सगळे शिक्षक अवाक झाले.मला मात्र चूक कळलेली होती,मोठ्या माणसांप्रमाणे आपल्याही खिशात रुमाल असावा म्हणून मी "बाईंचा रुमाल" चोरला होता. जो त्यांनी ओळखला.
त्याच अवस्थेत मी घरी गेलो.पुढचे आठ दिवस सुश्रुषा अर्थात बाईनीच केली.जखम बरी झाली पण व्रण म्हणून शरीरावर आणि संस्कार म्हणून मनावर तो प्रसंग कायम स्वरूपी कोरला गेला.
आजकाल खेळातला आईचा रुमाल कायमचा हरवला आणि असे संस्कार देणारा बाईंचा रुमाल सुद्धा दुर्मिळ झाला आहे.आपल्या पिढीला हे वाचून एखादा प्रसंग हमखास आठवेल पण चिंता वाटते ती येणाऱ्या पिढीची …
खरंच त्यांच्याकडे असे काही लिहिण्या-सांगण्या सारखे असेल ना ?
No comments:
Post a Comment