"म्हाळाचे"बदलते स्वरूप …
सध्या पितृ पंधरवडा सुरु आहे. त्यामुळे रोज कुठे ना कुठे महालयाचे (आमच्या मालवणीत "म्हाळाचे") आमंत्रण हमखास असतेच. अश्याच एक-दोन ठिकाणी त्याचे बदलते स्वरूप अनुभवायला मिळाले.
पूर्वीच्या काळी गावात क्वचितच दोन चार "म्हाळ" असायचे.त्यामुळे गावात यंदा कुठे म्हाळ आहे,याचं ऒत्सुक्य लहानथोरांना असायचं. मग तो दिवस आला की,जवळपास अख्खा गाव तिकडे लोटायचा.वरण-भात,उसळ आणि वडे-सांभाऱ्यावर एथेच्छ ताव मारायचा.तनामनाने तृप्त व्हायचा आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायचा,इकडे यजमानी सुद्धा (अन्नदानाच्या) पुण्यकर्माच्या समाधानाने भरून पावायचा.
आज त्यामानाने खाण्यापिण्यात फार सुबत्ता आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच घरांमध्ये ठराविक कालांतराने "म्हाळ"घातला जातो.मात्र बहुतेकांनी आपल्या "सोशल स्टेटस"प्रमाणे त्याचा "इव्हेन्ट"केलाय,जेवणावळीत खास मेनू,उपवासकरी मंडळीना स्पेशल गिफ्ट इत्यादी.
या सर्व गोष्टी काळाच्या ओघातला बदल असेलही कदाचित,पण तो स्वीकारार्ह तोपर्यंत असेल,जोपर्यंत कोणत्याही घरात वयोवृद्धांचा "दीनवाणा चेहरा" दिसणार नाही आणि गावात"वृद्धाश्रमाची पाटी"दिसणार नाही.
सध्या पितृ पंधरवडा सुरु आहे. त्यामुळे रोज कुठे ना कुठे महालयाचे (आमच्या मालवणीत "म्हाळाचे") आमंत्रण हमखास असतेच. अश्याच एक-दोन ठिकाणी त्याचे बदलते स्वरूप अनुभवायला मिळाले.
पूर्वीच्या काळी गावात क्वचितच दोन चार "म्हाळ" असायचे.त्यामुळे गावात यंदा कुठे म्हाळ आहे,याचं ऒत्सुक्य लहानथोरांना असायचं. मग तो दिवस आला की,जवळपास अख्खा गाव तिकडे लोटायचा.वरण-भात,उसळ आणि वडे-सांभाऱ्यावर एथेच्छ ताव मारायचा.तनामनाने तृप्त व्हायचा आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायचा,इकडे यजमानी सुद्धा (अन्नदानाच्या) पुण्यकर्माच्या समाधानाने भरून पावायचा.
आज त्यामानाने खाण्यापिण्यात फार सुबत्ता आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच घरांमध्ये ठराविक कालांतराने "म्हाळ"घातला जातो.मात्र बहुतेकांनी आपल्या "सोशल स्टेटस"प्रमाणे त्याचा "इव्हेन्ट"केलाय,जेवणावळीत खास मेनू,उपवासकरी मंडळीना स्पेशल गिफ्ट इत्यादी.
या सर्व गोष्टी काळाच्या ओघातला बदल असेलही कदाचित,पण तो स्वीकारार्ह तोपर्यंत असेल,जोपर्यंत कोणत्याही घरात वयोवृद्धांचा "दीनवाणा चेहरा" दिसणार नाही आणि गावात"वृद्धाश्रमाची पाटी"दिसणार नाही.